आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना चारीमुंडी चित करु - भगिरथ भालके


 पंढरपूर:
श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखानदारी चालविणाऱ्यांनी आमदारकीचे स्वप्न बघु नये. मी भविष्यात कारखाना सोडून कुठलीही निवडणुक लढविणार नाही असे सांगून सत्ता मिळविणाऱ्या केवळ दोनच महिन्यात आमदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. जनतेच्या आर्शिवादाने त्यांना चारी मुंडया चित करु असा विश्वास भगिरथ भालके यांनी व्यक्त केला.

पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, विठठल साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज पाटील, गणेश पाटील, समाधान काळे, दशरथ खळगे, राजाराम बाबर, राजाराम जगदाळे, शहाजी साळूंखे, सुरेश देठे, नागेश फाटे, सुधाकर कवडे, महादेव देठे, आण्णा शिंदे, उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने